Powered by Blogger.

Thursday, 21 September 2017

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणा द्वारे समाज क्रांती घडवून आणली --अजितकुमार पाटील

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी

   कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरातील इ.स.१८७१ ची स्थापना असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये
* *राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन* उत्साहात संपन्न झाला..
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील,व श्री.रुद्र पाटील,यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्त शाळेमध्ये लहान गट व मोठा गटात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,यांचे शाहू शिक्षण क्रांती सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.स्वागत संदिप वाघमारे यांनी केले,तर प्रास्तविक व शाहू शिक्षण क्रांती दिनाची माहिती मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी दिली.आपल्या मनोगत मध्ये,राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील सर्व लोकांचा अभ्यास करून अज्ञान व निरक्षरता नष्ट करायची असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे,सुसंस्कृत झाली पाहिजे याचा ठाम असा विश्वास राजर्षी शाहू महाराजांना होता.म्हणून 21 सप्टेंबर 1917 या दिवशी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा केला."शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवण्याची आई वडिलांना सक्ती करण्यात आली होती.मुले शाळेत पाठवली नाहीत ,तर त्यांना प्रत्येकी महिन्याला एक रुपया दंड करण्याची तरतूद करण्यात आली होती."यासाठी एक शिक्षण तज्ञांची  समिती नेमून एक लाख रुपये खर्च करण्याचे जाहीर केले होते.अश्या प्रकारे शाहू महाराजांनी शिक्षणात समाज क्रांती घडवून आणली.असे प्रतिपादन मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.यावेळी श्रावणी पाटील, समीक्षा जामदार,शाहिद करजगे, अनुप पाटोळे,मयुरी कांबळे,निषिका शिंदे,श्रुती चौगले,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले ,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव, सुजाता आवटी , प्राजक्ता कुलकर्णी,अरुण सुनगार,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,गायत्री प्रभावळे मॅडम, सेवक हेमंतकुमार  पाटोळे ,मंगल मोरे तसेच  भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित.
कार्यक्रमाचे आभार समीक्षा पाटील हिने मानले.

No comments :

Post a Comment