Powered by Blogger.

Monday, 20 February 2017

रस्ता केला वाया गेला , सांगली-कोल्हापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा - आठवड्यात तीन बळी

No comments :
Exclusive Report -DNYANRAJ PATIL , KOLHAPUR




सार्वजनिक खात्याच्या भोंगळ कारभारामुळे सांगली ते कोल्हापूर चौपदरीकरण करताना ज्या अक्षम्य चुका घडल्या आहेत त्या जनतेला पुढील कित्येक वर्षे भोगव्याचं लागणार आहेत .कोल्हापूर ते सांगली रस्त्याचे चौपदरीकरण करताना जो दुपदरी रस्त्यांचा घोळ;घातला आहे तो जगातील कोणत्याही वाहतूक व रस्ते तज्ज्ञाला न समजणार आहे , कंत्राटदाराने आपल्या फायद्यासाठी सरकारी बाबूंना हाताला धरून जनतेला चक्क फसवले आहे नियमानुसार प्रस्तावित रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असताना तत्कालीन सरकारने आपल्या फायद्यासाठी घाईगडबडीने शिरोली ते अंकली पूल असा चौपदरीकरणाच्या घाट घातला .पण तोही रस्ता अरुंद व अपूर्णावस्थेत आहे ,लोकप्रतिनिधींना याचे काहीही सोयरसुतक नाही , अंकली पूल ते बसवाण खिंडीपर्यंत जो चौपदरीकरण ऐवजी दुपदरी रस्ता केल्याने या मार्गावर वाहनांची रहदारी सुरळीत होत नाही, कित्येक वेळा ओव्हरटेकिंगच्या नादात अनेक अपघात घडले आहेत अनेक बळी गेले असून जखमीही होत आहेत , अंकली पूल ते उदगाव , जयसिंगपूर ,तम्दलगे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असून भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक बसण्याचे असंख्य अपघात घडले आहेत ,आजचा नुकताच घडलेला पल्सर व डम्परचा अपघात मनाला चटका लावणारा आहे यात वडिलांसह ३ वर्षाच्या चिमुरडीचा नाहक बळी गेला आहे तर गत आठवड्यात भरधाव क्रेटा कारने धडक दिल्याने युवकाचा अंत झाला ,

    जनतेने व माध्यमांनी यावर आवाज उठवून सार्वजनिक बांधकाम खात्याला खडबडून जागे केले पाहिजे अन्यथा उद्या आपला किंवा नातलगांचा , मित्राचा बळी गेल्यावर हळहळ करण्यापलीकडे उपाय उरणार नाही 

No comments :

Post a Comment