Friday, 15 September 2017
विद्यार्थ्यांनी लहानपणीच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय प्राप्तीसाठी झगडले पाहिजे - इंद्रजित देशमुख
पैजारवाडी प्रतिनिधि :- विद्यार्थ्यांनी लहानपणीच आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय प्राप्तीसाठी झगडले पाहिजे.प्रयत्नाची पराकष्टा केली पाहिजे असे प्रतिपादन जि.प.कोल्हापूरचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी देवाळे (ता पन्हाळा) येथे विदयार्थी दत्तक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले
देवाळे गावचे सुपुत्र भगवान पाटील यांनी गावातील दहा मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतली आहेत.या कार्यक्रमात बोलताना
ते पुढे म्हणाले मुलांनी स्वतःच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे.श्रीमंत माणसं देणग्या देत असतात पण भगवान पाटील यांच्या सारख्या स्वकष्टावर संसाराचा चरिरार्थ चालवत समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे फारच कमी लोक असतात त्याच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा.आणि स्वतःचे व आई-वडिलांचे नाव उज्वल करावे.असे विदयार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नवले होते.
यावेळी भगवान पाटील यांचा श्री. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याच बरोबर श्री पाटील यांनी दत्तक घेतलेल्या काजल ढेरे,धीरज ढेरे,सोनम पाटील, प्रदीप पाटील,श्रेयस लोहार,वैष्णवी शिंदे,निशिकेश पाटील,रोहन मगदूम,अभिजित लोहार,अनिकेत जाधव,या विद्यार्थाना उपस्थित मान्यवराच्या हस्ते शालेय साहित्य व फी देण्यात आली
लोक राजा शाहू महाराजांच्या मुळेच गरीबांच्या शिक्षणाची दारे खुली झाली.विद्यार्थांनी शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्या समोर ठेवला पाहिजे जिध्दीने प्रयत्न केल्यास अशक्य गोष्टी साध्य होतात असे श्री.नवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी शिवशाहीर राजू राऊत,शाहीर अजित आयरेकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस चंद्रकात गराडे,देवाळे उपसरपंच राजू विभूते,रामभाऊ पाटील,पैजारवाडी सरपंच अलका हिरवे, पुढारीचे वार्ताहर कृष्णात हिरवे, तरुण भारतचे भीमराव पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती होते.
No comments :
Post a Comment